Sunday, April 26, 2026

दुर्गराज रायगड मोहीम वृत्तांत - भाग १: ( संकल्प, कूच आणि पाचाडचा विसावा)

 ।। श्री ।। 


।। दुर्गराज रायगड मोहीम वृत्तांत ।।


"प्रस्तुत वृत्तांत असा कीपुणे मुक्कामी असलेल्या आमच्या कचेरीतील (Office) स्नेह्यांनी बहुदिवस आग्रहाचा मांडला होता. 'एखाद्या दुर्गम दुर्गाची भेट घडावीअशी सर्वांचीच मनीषा होतीत्यावरूनविचारवंतांनी मसलत केली कीस्वराज्याची आणि श्री शिवछत्रपतींची राजधानी 'दुर्गराज रायगडयाहून श्रेष्ठ स्थान दुसरे कोणते

दुर्गराज रायगडाच्या दर्शनाचा मनसुबा सिद्ध जाहला. तो दिवस शके १९४८, पराभव नाम संवत्सरे, ऋतू वसंत, मास चैत्र, कृष्ण पक्ष, तिथी नवमी, मंदवार (शनिवार, ११ एप्रिल २०२६) हा सुमुहूर्त निश्चित केला.

रायगड निवडीचे प्रयोजनही विशेष होतेयातील कित्येक जणांनी दुर्गांची महती केवळ ग्रंथांतूनच श्रवण केली होतीपरंतु प्रत्यक्ष दर्शन घडले नव्हतेकित्येकांना आपली अर्भके (Children) सोबत घेऊन शिवचरित्राचा अनुभव घ्यायचा होतारायगड हा पर्वत जसादुर्गमतसाच तो वास्तूंचा खजिनाइतर दुर्गांवर  दिसणारे प्रासादांचे आणि इमारतींचे अवशेष येथे आजही साक्ष देत उभे आहेतज्यांची शरीरे कष्टास समर्थ आहेतत्यांच्यासाठी 'पायवाटआणि ज्यांना शारीरिक मर्यादा आहेतत्यांच्यासाठी 'रज्जुमार्गाचीसोय उपलब्ध आहेहे जाणून मोहिमेचे घाट घातलेपूर्वी केलेल्या रायगड चढाईचा आमचा अनुभव आणि साक्षात वास्तुविशारद गोपाळ चांदोरकर यांच्याकडून प्रत्यक्ष गडावर श्रवण केलेलीत्यांनी केलेल्या सखोल अभ्यासातून उलगडलेली ऐतिहासिक महती या स्नेह्यांपर्यंत पोहोचवण्याची ही एक अपूर्व संधी आहेअसे मानून या मोहिमेचा श्रीगणेशा केला."

।। रसद आणि तजवीज ।।

"पुण्यनगरी ते दुर्गराज रायगड हे अंतर ७० कोसांच्या (१४० किमीसुमारास भरतेयेण्या-जाण्याचा हा पल्ला पार करताना वाहनधारकांचे हिशोब आणि तजवीज पाहणे अगत्याचे होतेवाहतूकदारांचे रीतीप्रमाणे ३०० किमीचे भाडे आकारले जात होतेपरंतु त्यात आमचा काही अंशी तोटा दिसत होताअशा समयी कचेरीतील एका अनुभवी कारभाऱ्याने (ज्येष्ठ सहकारीमध्यस्थी केली आणि १०,००० सुवर्णमुद्रांच्या (रुपयांच्यामर्यादेत हा सर्व प्रवासखर्च आणि वरखर्च बसवून दिला.

केवळ रथशाळेचीच (वाहतुकीचीनव्हेतर तळाला मुक्कामासाठी लागणाऱ्या छावणीची (Base Camp) व्यवस्थाही त्यांनी अत्यंत माफक दरात लावून दिलीदोन खोल्यांची व्यवस्था प्रति खोली २००० या दराने झाली आणि त्याच ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पंगतीचा (थाळीचाबेत १८० प्रति व्यक्ती असा निश्चित झालाआता अन्नाची आणि प्रवासाची नाहक चिंता दूर झाली होतीसर्व मावळे डोळे लावून त्या ११ तारखेची वाट पाहू लागले आणि पाहता पाहता तो मंगल दिन समीप आला..."

।। दुर्गप्रेमींचा मेळा ।।

"या रायगड भेटीसाठी ठिकठिकाणच्या स्नेह्यांचा एक 'मेळाजमलाही काही युद्धाची तयारी नव्हतीतर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेली एक 'शांतीची वारीहोतीयामध्ये:

· पुण्यनगरीतून: दीक्षित आणि त्यांचे भाचे उत्साहाने सामील झाले

· आकुर्डी परिसरातून: गायकवाड आपल्या पत्नी आणि दोन कन्येसह या प्रवासास निघाले

· गहुंजे पंचक्रोशीतून: चव्हाण पती-पत्नी आपल्या लहान मुलीला शिवचरित्र दाखवण्यासाठी सोबत घेऊन आले

· भोसरी आणि मोशी प्रांतातून: जाधव भगिनी आपल्या पुत्रासहतसेच पारखी आणि वारके हे आपापल्या अर्धांगिनीसह या यात्रेत दाखल झाले.

असे हे एकूण १५ 'दुर्गप्रेमी', संसाराच्या व्यापातून वेळ काढूनसह्याद्रीच्या कुशीत विसावण्यासाठी आणि इतिहासाची पाने प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी एकत्र आले..."

।। कूच आणि प्रस्थान ।।

"मध्यान्ह उलटल्यावर चित्त कामात लागेनासे झालेसर्व स्नेही आपापले प्रवासाचे गाठोडे (समानबांधून सज्ज होत होतेसूर्यास्त समीप येत असतानासाडेपाच घटिकांच्या (:३०सुमारास कचेरीच्या द्वाराशी रथाचे (गाडीचेआगमन झालेउन्हाचा कडाका ध्यानी घेऊनप्रवासासाठी आणि गडाच्या चढाईसाठी लागणारी जलाची (पाण्याचीतरतूद आधीच करून ठेवली.

दीक्षितगायकवाडपारखीवारके आणि चव्हाण ही मंडळी वेळेत हजर झालीमात्र जाधव भगिनींच्या आगमनास काही अंशी विलंब झालानियोजित प्रस्थानाची वेळ टळून गेली होती आणि साडेसहाचा सुमार झाला होताअखेर सर्व मंडळी रथात आरूढ झाली आणि प्रवासाचा श्रीगणेशा झालाप्रवासाचा विलंब लक्षात घेऊनतातडीने तळाला (Base Camp) सांगावा धाडला कीपोहचण्यास उशीर होईलपरंतु भोजनाची पंगत १५ जणांचीच सिद्ध (तयारठेवावीअसा हा शिस्तबद्ध बेत आखून आमचा ताफा रायगडच्या दिशेने मार्गस्थ झाला..."

।। मार्गाक्रम आणि आनंदोत्सव ।।

"आमच्या रथाचे सारथी (ड्रायव्हरमोठे अनुभवी आणि जाणकार होतेहिंजवडीसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून निर्विघ्नपणे मार्ग कसा काढावायाचे त्यांना उत्तम कसब होतेप्रवासाचा श्रीगणेशा होताच सारथी काकांनी साद घातली की, 'असे शांत काय बसलातकाही सुश्राव्य संगीत छेडा!' हे ऐकताच सर्व दुर्गप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलेआधुनिक यंत्रांची (Mobile/Bluetooth) जुळवाजुळव झाली आणि गाडीत धडाकेबाज गीतांचा गजर सुरू झालामग कायअबालवृद्ध सर्व मंडळी रथातच ताल धरू लागलीड्रायव्हर काकांनी सुरुवातीलाच सर्वांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण केले. 'झटपट पटापटपासून ते नवनवीन गीतांपर्यंत सर्वच सुरावटींवर ठेका धरला गेलाआम्हासही नृत्याचा आग्रह झालापरंतु आमची त्या कलेत गती बेताचीच असल्याने आम्ही प्रेक्षक म्हणून आनंदी होतो.

रथ पौड परिसर सोडून मुळशीच्या अरण्याकडे वळलातशी दुर्गम भागामुळे संगीताची साथ सुटली (Network गेले). अवघ्या वातावरणात काही काळ नीरव शांतता पसरलीमुळशी येथे रथाचा विसावा झालातेथे पारखी यांच्या अर्धांगिनीने आपल्या सुगृहिणीपणाची साक्ष देत अत्यंत रुचकर 'पराठेसिद्ध (तयारकरून आणले होतेत्या पंगतीचा सर्वांनी यथेच्छ आस्वाद घेतलासोबत चहा-कॉफीचा आस्वाद घेतल्याने कचेरीतून निघताना लागलेली क्षुधा (भूकशांत झाली आणि शरीरात पुढील प्रवासासाठी नवा जोम संचारला..."

"मुळशीचा विसावा आटोपून आमचा रथ ताम्हिणी घाटाच्या रोखाने मार्गस्थ झालात्या घट्ट काळोखात मुळशीच्या विस्तीर्ण जलाशयात पलीकडच्या तीरावरील दीपांचे प्रतिबिंब एखाद्या सुवर्णकणांसारखे झळकत होतेते दृश्य मोठे विलक्षण भासत होतेअशातच पारखी स्नेह्यांनी 'नाट्यसंगीताचास्वर छेडलात्या सुरावटींनी अवघ्या वातावरणात जणू प्राण फुंकलेचहूकडे निबिड अंधारदूरवर कोठेतरी लुकलुकणारा अंधुक प्रकाश आणि त्या शांततेचा छेद घेणारा आमच्या रथाचा ध्वनीअसा हा सर्व योग मोठा मंतरलेला होतामनाला मोहवून टाकणारा हा प्रवास करीतघाटाची नागमोडी वळणे लीलया पार करून आमचा ताफा 'विलेप्रांतात (MIDC) दाखल झाला..."

"विले ओलांडल्यानंतर निजामपूरचे ठाणे लागलेयेथूनच दुर्गराज रायगडच्या दिशेने जाणारा नजीकचा मार्ग फुटतोपुण्यनगरीपासून निजामपूर हे साधारण पन्नास कोसांवर (१०० किमीअसल्यानेआता केवळ १५-२० कोसांचा (३०-३५ किमीटप्पा अवशिष्ट होतामार्ग जरी अल्प असलातरी तो मोठा फसववा आणि दुर्गम आहेनागमोडी वळणे आणि चढ-उतारांमुळे सारथ्याच्या कौशल्याची मोठी परीक्षाच होती.

जसजसे आम्ही गडाच्या समीप जात होतोतसे आमचे डोळे काळोखातही दुर्गराजाचे प्रथम दर्शन घेण्यास आतुर झाले होतेपरंतुतो निबिड अंधार भेदून काहीच दिसेनासे झालेअखेर साडेदहा घटिकांच्या (१०:३०सुमारास आमचा ताफा 'पाचाडया ऐतिहासिक भूमीत दाखल झालापाचाडमधूनही गडाचे दर्शन घडणे दुरापास्त होतेपरंतु शेवटच्या वळणावर आमचा रथ उभा ठाकला आणि साक्षात दुर्गराज रायगड समोर प्रकटलात्यानंतर मुक्कामाच्या छावणीची (Base-Camp) पुसपास केली आणि अवघ्या काही क्षणात आम्ही विश्रांतीच्या ठिकाणी सुखरूप दाखल झालो..."

।। आतिथ्य आणि नक्षत्रांचे कौतुक ।।

"पाचाड मुक्कामी नीलम ताई औकीरकर यांच्या गृही आमचा मुक्काम ठरला होतात्यांनी मोठ्या अगत्याने आमचे स्वागत केलेनिवासासाठी दोन स्वतंत्र दालने (खोल्यासिद्ध होतीएक पुरुषांसाठी आणि दुसरे सौभाग्यवतींसाठीप्रवासाचा काळ आणि रात्रीची वेळ यामुळे क्षुधा (भूकतीव्र झाली होतीविहित कर्माने हस्तप्रक्षालन उरकून आम्ही पंगतीला बसलोतेथे गरमागरम भाकरीअस्सल पिठले आणि मसुराची उसळ असा सात्विक बेत होतात्यांच्या हस्तकौशल्याने बनवलेल्या 'लोणच्यानेतर जेवणाची चव अधिकच वाढवलीत्या तृप्त भोजनानंतर सर्व मंडळी आबालवृद्ध सुखावली.

भोजनानंतर आम्ही निवासाबाहेर असलेल्या मोकळ्या प्रांगणात आलोतेथे साक्षात चंद्रमौळी चांदण्याचा लख्ख प्रकाश भूमीवर अवतरला होतामहानगरातील धुरामुळे  दिसणारे ते नक्षत्रांनी नटलेले आकाश पाहून अर्भके (मुलेविस्मित झालीमग त्यांना आधुनिक यंत्राच्या (Mobile App) साह्याने नभमंडळातील ग्रह-ताऱ्यांची ओळख करून दिलीसमोर तळपणारा तो तेजस्वी गोळा म्हणजे 'गुरु' (Jupiter) ग्रह आहे हे उमजताचत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीजणू काही त्यांना नभातील खजिनाच गवसलापरंतुदुसऱ्या दिवशीच्या मोहिमेसाठी देहास विश्रांतीची निकड होतीपहाटे ब्राह्ममुहूर्तावरम्हणजेच तीन घटिका (:००रात्री असताना उठण्याचा दंडक घालून आम्ही निद्रेच्या आधीन झालो..."

।। अंतराल: चित्तातील द्वंद्व )।।

"छावणीत शांतता पसरली आणि सर्व स्नेही निद्रेच्या आधीन झालेपरंतु आमच्या नयनी निद्रा नव्हतीमनामध्ये विचारांचे काहूर माजले होतेहे सर्व मावळे समयी जागे होतील कासुकुमार अर्भके आणि भगिनींना या निबिड अंधारात पल्ल्यावर नेणे धाडसाचे तर ठरणार नाही नादिनकर उगवण्यापूर्वी दुर्गराजाचे दर्शन घडेल कावाटेत कोणाचे धैर्य खचले तर काय करावेअसे अनेक तर्क-वितर्क मनात घोळत होतेअशा समयी समर्थांच्या ओळींचे स्मरण झाले आणि चित्ताला उभारी      मिळाली:

मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥

येविसीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥१॥

Monday, August 08, 2016

रसाळगड

रसाळगड

सह्यमेळाव्याचा निमित्ताने रसाळगड ला भेट देण्याचा योग आला. आगदी ठरल्या वेळेप्रमाणे गाडी ठिकाणावार आली आणि एकेकाला घेत चांदणी चौक ओलांडुन पुढे आलो. सकाळपासुन फारसा पाउस झाला नव्हताच आजुनही तसेच वातावरण होते नुसते ढगाळलेले. थोडे अंतर पुढे गेल्यावर आप्पा ने गाडीत डिझेल भरावे लागेल असे सांगितले, पंपाच्या शोधात आम्ही पार हिंजेवाडी मधे जाऊन पोहोचलो. नेहमी प्रमाणे पुण्याची गाडी पोहोचायला उशीर होणारच आता. 

पौड सोडल्यावर वातावरण एकदम बदलले एकदम कोंदट झाले होते आणी एकाएकी पाउस कोसळू लागला एकदम धुव्वाधार. घाटमार्गाला लागलो तसा पावसाचा जोर खुप वाडला होता, आगदी १०-१२ फुट पुढचे काहीच दिसत नव्हते. तरीही आप्पा गाडी चालवता चालवता आम्हाला रस्त्याच्या कडेने त्याला दिसलेले साप दाखवत होता. हा आप्पा एक पक्का ट्रेक ड्रायव्हर आहे. 

गाडीमधे, ओंकार त्याचे रेस्क्यु मधे आलेले अनुभव, आशु त्याचा जम्मु-पुणे सायकल मधल्या काही घटना, मायबोली, इत्यादी गप्पा चालुच होत्या. माण ला पोहोचलो तेव्हा एका टपरीवर एक म्हातारे आजोबा चहा विकत बसले होते तिथे चहा प्यायला थांंबलो. पाउस चालुच होता संततधार. आजुन २-३ तास प्रवास होता. 


खेड ला पोहोचे पर्यंत पुर्ण उजाडले होते. पाउस चालुच होता, चहा पिण्यासाठी परत उतरलो. इथे चहाबरोबर भजी, वडे, पॅटीस, मंचुरीयन भजी इत्यादी गरम गरम तयार होते ते ही सकाळी ६.३० वाजता. चहा पिताना एकाने विचारले पॅटीस गरम आहे का ?? तर त्या टपरीवाल्याने ते पॅटीस परत कढईत टाकुन तळले म्हणाला ग्या साहेब गरम पॅटीस. टपरी वाल्याने सांगितल्या नुसार, इथे या भागामधे २ दिवसांपासुन पाउस लागुन राहिला होता आजुन २ दिवस राहीला तर जगबुडी नदीला पुर येउन आमचा परतीचा रस्ता बंद होणार होता. थोडे पुढे गेल्यावर जगबुडी नदीवरील पुलाच्या वर पाणी येण्यासाठी फक्त २ फुट अंतर बाकी होते.


अर्ध्या पाउण तासात रसाळगडाची वाट गाडी चढू लागली, इथे अर्ध्यापर्यंत चांगला गाडी रस्ता झाला आहे. अर्ध्या तासाची पावसाची उघडीप मिळाली होती. पण जसं गाडीतुन उतरलो तसे पुन्हा पाउस सुरु झाला.   तिथुन १५-२० मिनीटात रसाळागड वाडीच्या खिंडीत पोहोचलो. इथुन ट्रेक ला सुरुवात झाली.

किल्ला चढायला सुरुवात केली, पाय-यांची वाट आहे, थोडे वर गेलो आणी पहीला दरवाज्यापाशी पोहोचलो पण. बाजुलाच तटावर मारुतीराय विराजमान झालेले आहेत. पुढे पाय-या ने वर जात दुसरा दरवाजा ओलांडुन पुढे गेलो धुक्यामुळे फार पुढचे काही दिसत नव्हते त्यात भणाणता वारा आणी धो-धो पाऊस. २०-२५ मिनिटांच्या चढाईत झोलाई देवीच्या मंदिरा पाशी येउन पोहोचलो. मुंबई वरून आलेली मित्र मंडळी आमची वाटच पहात थांबले होते. पोहोचल्यावर गळाभेटी झाल्या.







झोलाईचे मंदीर हे गडावरचे मुख्य दैवत, मंदीर एकदम प्रशस्त आहे ३०-३५ लोक आरामात मुक्काम करू शकतात. मंदिरात पोहोचल्यावर एक कोपरा पकडला कोरडे कपडे घातले तो पर्यंत गावातून पोहे आणी गरम चहा हाजीर. सकाळचे १० वाजले असतील. सुरवातीच्या सत्रात सर्वांनी आपापली ओळख करुन दिले. सुनटुन्या, हेम, मध्यलोक, आशुचॅम्प, पवन, ओंकार ओक, यो रॉक्स, सिद, विनय भिडे, घारूआण्णा, गिरीविहार, इंद्रधनुष्य, हिम्सकुल, मल्ली, आका, मनोज यांच्या उपस्थितीत सह्यमेळाव्याच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. थोड्या गप्पा होइस्तोवर जेवण आले. जेवल्यावर सगळेच पेंगुळले. मी वाट बघत होतो ती पाऊस थांबायची. गडाचा फेरफटका मारायची इच्छा मनात चुळबुळत होती.  थोडसं पडलो ते एकदम झोपच लागली. 

तासाभराने जाग आली, बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. एकटाच बाहेर पडलो. मंदीरा समोर सुरेख दिपमाळ आहे. बाजुला बांधीव टाके आहे, त्यातले पाणी पिण्यासाठी वापरले जाते तर त्या समोरच आजुन एक टाके आहे. पावसाने दोन्ही टाकी पुर्ण भरली होती.  त्यापुढे तटबंदी, बुरुज असलेली गडाची मुख्य इमारत आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच चुनखडी मळण्याचा घाणा दिसतो. त्यापुढे राजवाड्याचे जोते आता शिल्लक आहे. थोडे तिथेच इकडे तिकडे फिरलो तर तितर त्याच्या पिल्लांसहीत एका झुडुपात शिरताना दिसले त्याच्या मागे गेलो तो पर्यंत ते गायब झाले. पाऊसाला परत सुरुवात झाली म्हणुन परतलो तर सगळे जण हातात दो-या घेऊन गाठी मारत होते. विरग ने माझ्या हातात दोर दिला. सुनटुण्या दोराच्या सहाय्याने पर्वतारोहण करताना उपयोगी पडणा-या सोप्या गाठी कश्या माराव्यात याचे मार्गदर्शन करत होता. कोणत्या वेळेस कोणत्या पद्धतीने दोर बांधावा, योग्य प्रकारे गाठी मारुन जास्तीजास्त सुरक्षीत पणे कशी चढाई करता येते हे त्याने प्रात्यक्षिकांसह दाखवले आणी वेगवेगळ्या साहित्याची ओळख करून दिली.  त्यातल्या काही गाठी विराग ने माझ्या कडुन करून घेतल्या. विराग ने ट्रेकिंग च्या पाऊच मधे काय काय असले पाहिजे आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो हे त्याच्या जवळील पाऊच मधुन एकेक वस्तु काढुन दाखवले. 

मी मल्लीनाथ आणि त्याचा मुलगा परत किल्ला पहायला बाहेर पडलो, राजवाड्याच्या तटबंदीतुन मागच्या बाजुला उतरलो पाउस पुर्ण थांबला होता. तरीपण ढगांचे अच्छादन कमी झाले नव्हते, भयाण वारा सुटला होता ढग पुढे सरकत होते तितकेच परत मागुन येत होते. स्वर्ग म्हणतात तो हाच असावा. पाउलवाटेने गडाच्या कोपर्‍यापर्यंत पोहोचलो आणि सिनेमा चालू होताना पडदा उघडावा तसे ढग बाजुला झाले. निव्वळ अप्रतीम नजारा याच साठी मी इथे आलो होतो. आजुबाजूला हिरवेगार डोंगर त्यावरून कोसळार्‍या शुभ्र धारा, दरी मधे नागमोडी वळाणे घेत धावणारी जगबुडी नदी. डोळे एका जागी स्थिर रहात नव्हते. सारा आसमंत डोळ्यात साठवण्याचा केविलवाणा प्रयत्न. एकदम लक्षात आले आपण सोबत कॅमेरा आणलाच नाहीये.  धावतच परत मंदिरात गेलो, कॅमेरा घेतला तो पर्यंत पाऊस उघडल्यामुळे सगळीच गँग बाहेर धुडगुस घालायला निघाली होती. तटबंदीवर पोहोचलो तो पर्यंत परत ढग दाटले इतके की बुरुजावर थांबलेल्या लोकांचे फक्त आकार समजतील. मग त्यांचे काही फोटो घेतले. 























गडाच्या तटावर जावून ढग निघुन जाण्याची वाट पहात थांंबलो, काही वेळातच ढगांचा पडदा परत बाजूला झाला. द-या खो-यातून नागमोडी वळणे घेत जाणारी जगबुडी नदी, सभोवतालच्या डोंगरांवरून कोसळणारे धबधबे, दुर परंत पसरलेल्या डोंगररांगा आणि त्याच्या माथ्यावर रेंगाळणारे ढग. अतिशय विहंगम दृश्य काहिंनी नजरेने पिले तर काहिंनी कॅमे-यात बंदिस्त केले. मुलांनी इतका धुडगुस घातला की ज्यु. मल्लिनाथ आणि ज्यु. फडणविस यांना आपण दोघेच लहान आहोत का आपण आपल्या वर्गमित्रांबरोबर इथे आलो आहोत हा प्रश्ण नक्किच पडला असेल. बराच वेळ तिथे घालवल्यावर माघारी फिरलो वाटेत एका-दोन तोफा इतस्तत: पडलेल्या दिसल्या, गडावर एकूण १६ तोफा असल्याबद्दल कोणीतरी उल्लेख केला. गडाचे डागडुजीचे काम सुरू असल्याने त्याचेही सामान वाड्याच्या आत व अन्यत्र पडलेले होते.  पाउस पुन्हा सुरु झाल्याने मंदिरात परतलो. पुढचे चर्चा सत्र सुरु झाले त्यात गडावर ट्रेकिंग ला घेउन जाणा-या अन्य व्यवसायीक ग्रुप बद्दल चर्चा झाली. ते झाल्यावर जेवण केले. 

































तितक्यात आजुन एक ग्रुप गडावर आला आणि मंदिरात आश्रय / घुसखोरी करता येते का ते पाहु लागले. त्यांचे आखाड पार्टीचे नियोजन होते. ओंकार आणि आजुन कोणी त्यांना शिताफीने इथे जागा मिळणार नसल्याचे आणि देवळात हे असले आणाता येणार नसल्याबद्दल समजावून त्यांची रवानगी समोर असलेल्या कोठाराच्या (?) जागेत केली. आम्ही सुद्धा तातडीने पथा-या पसरल्या आणि चर्चा सुरु केली त्यात पुरातन घाटवाटा, त्यात त्याची सध्याची परिस्थिती याबद्दल माहिती सांगितली गेली. हे चालू असताना एक एक मेंबर झोपेच्या आधीन होऊ लागले, मला झोप कधी लागली ते समजलेच नाही.  सकाळी लवकर उठायचे होते पण जागच आली नाही उठलो तर काही जण चहाची तयारी करत होते, काही सकाळाचे कार्यक्रम करायला बाहेर पडले होते, मी ही आटोपुन घेतले. हेम ने सगळ्यांकडुन कवायतीचे काही प्रकार करून घेतले. कोणतेही मेहनतीचे कार्य करण्यापुर्वी झोपेमुळे ताठरलेल्या स्न्यायुंवर एकदम ताण पडु नये या साठी हे अत्यंत गरजेचे आहे. ते झाल्यावर मल्लीनाथ आणि केळकरांनी स्टोव्ह चा ताबा घेतला आणि काही वेळातच इतकी जबरदस्त मिसळ बनवली की बास, त्याला तोडच नाही. 































त्यानंतर आशिष ने त्याचा जम्मु ते पुणे सायकल फेरी चा प्रवास आमच्या समोर उभा केला. मुंबैकरांना लांबचा परतिचा प्रवास करावयाचा असल्याने आवरा आवरी सुरवात केली आणि गड उतरायला सुरवात केली. गाडीजवळ आल्यावर निरोपाच्या चारोळी सांगितल्या गेल्या. मेळाव्याची येथे सांगता झाल्याचे मांडण्यात आले. खालच्या गावात एस. टी बस ची सोय असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी मुंबैकर आमच्या गाडीत बसुन खाली आले तर आम्ही काही जण चालत खाली उतरलो तेवढेच ट्रेक ला आल्याचे पायांना समाधान. मुंबैकरांचा निरोप घेतला आणि आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत सावित्री नदीचे दुथडी भरुन वहाणारे पात्र दिसले. ओंकार आजुबाजुला दिसणा-या गडांची नावे सांगत होता. महत्वाचे म्हणजे बरोबर आलेल्या दोन्ही लहानग्यांनी ट्रेक मधे पुरेपुर मजा केली होती. वाटेत जेवणासाठी एका ढाब्यावर थांबलो तो पर्यंत पावसाची ये जा चालुच होती. ताम्हीणीच्या मार्गे लागल्यावर धुव्वाधार बरसात चालू झाली. ताम्हीणीच्या घाटात तर कोसळणा-या सर्वच धबधब्यांनी सर्वांना वेड लावले. मुळशी येथे वहातुकीच्या कोंडीत गाडी अडकली आगदी कासवाच्या गतीने बरेच अंतर गेल्यावरही तसा वेग मिळालाच नाही. तरीपण फारसा उशीर न होता घरी पोहोचलो होतो. 

रात्री झोप काही येईना व्हॅट्सप वर कोण कुठे पोहोचले सुखरुप पोहोचले का याची विचारणा सुरुच होती. सगळ्यात शेवटी म्हणजे सकाळी ५ ला नाशीककर पोहोचले होते. पण त्यांचा उत्साहाला मनापासुन सलाम. रात्री डोळा लागल्यावरही डोळ्यासमोर तिच चर्चा मेळावा, गड, किल्ले, असेच सारे डोळ्यासमोर दिसत होते. मेळावा ठरण्यापुर्वी झालेला चर्चेचा गदारोळ. अचानक काहिंनी पुढे होऊन केलेले मेळाव्याचे नियोजन मोठे कौतुकास्पद होते. विषेश करुन गडावर झालेली जेवणाची आणि रहाण्याची सोय. आणि जाणकारांनी त्यांचा आमच्या समोर ओतलेला माहितीचा खजिना. 


ह्या सह्यमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३-४ वर्षाच्या काळाची निसर्गात/ सह्याद्रीत भटकण्याची भुक आज शमवली गेली. 



Other photos -